मुळात आपण हे लक्षात घ्यावे की साध्या हवेमध्ये अठ्याहत्तर टक्के नायट्रोजन असतो. त्यामुळे साधी हवा भरली तरी त्यामध्ये बहुतांशी नायट्रोजन असतोच.
नायट्रोजन विमानाच्या टायरमध्ये भरला जातो कारण खुप उंचावर विमान असताना टायरमधील हवेचे गुणधर्म बदलू नयेत तसेच विमान उतरताना प्रचंड वेगामुळे टायरचे तापमान वाढून टायर फुटू नयेत.
आपण गाडी विमान ज्या उंचीवर जाते त्या उंचीवर काही नेत नाही. अन विमान उतरतानाचा प्रचंड वेग तर गाडीला देत नाही.
तसेही भारतात गाडीच्या वेगावर ऐंशी किलोमीटर/ तास चे बंधन आहे आणि या वेगाने गाडी चालवल्यास टायर गरम होण्याची शक्यता कमी आहे. अधून मधून गाडी व चालक दोघांनाही आराम द्यायलाच हवा .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा